चंद्रपूर जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची कुठलीही टंचाई नाही - जिल्हाधिकारी
◾नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, जिल्हा प्रशासनाचे आवाहन
चंद्रपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज असून जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची पेट्रोल आणि डिझेलची टंचाई नाही. नागरिकांनी उगाच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्ह्यात पेट्रोल डिझेल टंचाई बाबत कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच विनाकारण पेट्रोल पंप वर गर्दी करू नये. पेट्रोल आणि डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी असेही प्रशासनाने कळविले आहे.






0 Comments